Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त संभाजीनगर येथे श्री गीता रामायण दिव्य सत्संगात हिंदुत्वनिष्ठांचे साकडे

सत्संगात साकडे घालतांना १. खासदार श्री. चंद्रकांत खैरे आणि उपस्थित भाविक

संभाजीनगर : ५ मे या दिवशी येथील गांधी मैदान येथे पार पडलेल्या श्री गीता रामायण दिव्य सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘त्यांना दीर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी भावपूर्ण साकडे घालण्यात आले. या कार्यक्रमात संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज (श्री गीता-रामायण सत्संग समिती), अध्यक्ष मा. आमदार श्री. सुभाष झांबड, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अन्य मान्यवर आणि भक्तगण यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला अनुमाने २ सहस्र ५०० भक्तांची उपस्थिती होती.

संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज श्री वृंदावन धाम पाल यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी दिलेला संदेश

वर्ष २००४ मध्ये उज्जैन येथील कुंभमेळ्यात आमचे गुरु प.पू. संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्यासमवेत सनातन संस्थेशी संपर्क आला. संस्थेविषयीची माहिती ऐकून आमच्या मनाला समाधान वाटले. चैतन्य परिवार सनातन संस्थेच्या समवेत आहे. आम्ही आपले आभारी आहोत. आज कित्येक कुटुंब, युवक-युवती सनातन संस्थेशी जोडले गेले आहेत. जेव्हा देशातील युवा पिढी सुसंस्कारित होईल, तेव्हाच भारताचे हिंदु राष्ट्र होईल.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *