![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2018/06/Adhivakta_Niraj_jain.jpg)
गोवा (विद्याधिराज सभागृह) – येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील प्रथम दिवसाच्या दुस-या स त्रात बोलताना अधिवक्ता नीरज जैन म्हणाले कि, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यांच्या जोडीला आता हॉटेल जिहाद ही आढळून येत आहे. हॉटेल जिहाद म्हणजे धर्मांधांनी हिंदूंच्या देवतांची नावे देऊन उपाहारगृहे चालवणे. महामार्गाच्या कडेला हिंदूंच्या देवतांची नावे असलेल्या अनेक खानावळी असतात. उदा. शिवकृपा हॉटेल, श्रीकृष्ण हॉटेल, मारुतिनंदन हॉटेल इत्यादी. प्रत्यक्षात ही सर्व उपाहारगृहे धर्मांधांच्या मालकीची असतात. हिंदूंच्या देवतेचे नाव उपाहारगृहाला दिले जाते; मात्र आतमध्ये देवतेची प्रतिमा इत्यादी काही नसते.
पूलाच्या बाजूला बांधलेल्या मशिदी ही धर्मांधांची युद्धाची सिद्धता
या काही वर्षांत रेल्वे स्थानकाच्या जवळ किंवा कुठल्याही पूलाच्या जवळ मशीद अथवा मदरसा असल्याचे आढळून येते. हा योगायोग नसून ती एक जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. जेव्हा भविष्यात युद्धजन्य स्थिती निर्माण होईल, तेव्हा दळणवळणाची अंतर्गत व्यवस्था नष्ट करणे, हा त्यामागचा उद्देश आहे.
धर्मरक्षणासाठी १५१ टाके पडूनही अखंड कार्यरत असलेले अधिवक्ता नीरज जैन !
बजरंग दलाचे माजी पदाधिकारी, अभाविपचे गुजरात माजी महामंत्री आणि वर्ष २००२ मध्ये कारसेवकांना जाळून मारल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये ७ ते ८ सहस्र हिंदूंना जामीन मिळवून देणारे आणि हे सर्व खटले विनामूल्य लढणारे प्रखर धर्माभिमानी अधिवक्ता नीरज जैन यांनी त्यांचे अनुभव सांगितले. विशेष म्हणजे श्री. जैन यांच्या हिंदुत्वाच्या कार्यामुळे एका आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी श्री. जैन यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना १५१ टाके पडले; मात्र तरीही त्यांनी त्यांचे धर्मरक्षणाचे कार्य चालूच ठेवले आहे.