Menu Close

कुराणाविषयी सत्य माहिती लोकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक ! – नीरज अत्री

नीरज अत्री, अध्यक्ष, राष्ट्रीय इतिहास अनुसंधान आणि तुलनात्मक अध्ययन केंद्र, पंचकुला, हरियाणा

‘इस्लाम शांतीचा संदेश देणारा धर्म आहे. ‘कुराणमध्ये ‘काफिरांना ठार मारा,  युद्धात मिळणार्‍या दुसर्‍यांच्या बायकांना तुम्ही वापरू शकता’, असे लिहिलेले नाही’ अशा अनेक खोट्या गोष्टी कुराणाविषयी प्रसृत केल्या जात आहेत. वास्तविक कुराणामध्ये ८ वे प्रकरण १२ वी आयत आणि ४७ वे प्रकरण ४ थी आयत यात काफिरांचे गळे चिरा, असा स्पष्ट उल्लेख आहे. याचप्रकारे कुराणचे ४ थे प्रकरण आयत क्रमांक २४ मध्ये युद्धात मिळणार्‍या दुसर्‍यांच्या बायका तुम्ही वापरू शकता, असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे कुराणाविषयी सत्य माहिती लोकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे, असे मत श्री. नीरज अत्री यांनी व्यक्त केले. ते धर्मपरिवर्तन झालेल्या हिंदूंचे शुद्धीकरण करण्यासाठी केलेले प्रयत्न, या विषयावर बोलत होते.

श्री. अत्री पुढे म्हणाले, ‘आज असदुद्दिन ओवैसीसारखे लोक, तसेच अनेक उलेमा कुराणविषयी सत्य माहिती मुसलमानांना सांगत नाहीत. ते कुराण केवळ अरबी भाषेत सांगतात, त्यामुळे सत्य लोकांपर्यंत पोचत नाही. जेव्हा आपण कुराणमधील सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवू, तेव्हा धर्मपरिवर्तन झालेले लोकही स्वधर्मात येण्यास सिद्ध होतील. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात संगणक हवा, तसेच त्यांनी सत्य माहिती मुसलमान समाजाला सांगावी. हरियाणामध्ये कुराणाविषयी सत्य माहिती देणारे शिकवणीवर्ग चालू केले आहेत. याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *