Menu Close

अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख भारतात येण्याच्या सिद्धतेत !

  • ‘भारत हिंदु राष्ट्र झाल्यास येथील अल्पसंख्यांक मुसलमान, ख्रिस्ती आदी धर्मियांचे काय होणार ?’, असे म्हणत हिंदु राष्ट्राला विरोध करणारे इस्लामी राष्ट्रांत अल्पसंख्यांक हिंदू, शीख यांचे काय होत आहे, याविषयी कधीच काही बोलत नाहीत !
  • भारताने गेली अनेक वर्षे अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणात अर्थिक साहाय्य केले आहे आणि अजूनही करत आहे; मात्र तेथील हिंदू आणि शीख यांचे संरक्षण करण्यासाठी म्हणून भारताने काहीही केलेले नाही !

काबूल – अफगाणिस्तानमधील इस्लामिक स्टेटने केलेल्या आत्मघाती आक्रमणात १९ हिंदू आणि शीख ठार झाल्यानंतर तेथील हिंदू अन् शीख यांनी भारतात आश्रय देण्याची मागणी केली आहे.

१. अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत विनय कुमार म्हणाले, ‘शीख आणि हिंदु समुदायाच्या लोकांना दीर्घमुदतीचा व्हिसा देण्याची सुविधा असल्याने त्यांना भारतात रहाण्यास अडचण येणार नाही.’

२. हिंदु आणि शीख नॅशनल पॅनलचे सचिव तेजवीर म्हणाले की, इस्लामी आतंकवादी इतरांची धार्मिक स्थळे नष्ट करतात. आम्ही मुसलमान नसल्यामुळे आमच्यावर आक्रमणे होत आहेत.

३. राजधानी काबूल आणि जलालाबाद येथे २ गुरुद्वार अन् मंदिरे आहेत. इस्लामी आतंकवाद्यांनी अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.

४. अफगाणिस्तान म्हणजे पूर्वीचा गांधार देश असून तो हिंदु देश होता. इस्लामी आक्रमणामुळे तो मुसलमानबहुल झाला. १९ व्या शतकापर्यंत तो भारताचा भाग होता; मात्र इंग्रजांनी त्याला भारतापासून वेगळे केले.

जलालाबाद येथील कापड दुकानदार बलदेवसिंह म्हणाले की, आमच्याकडे केवळ दोनच पर्याय आहेत. भारतात जाणे किंवा अफगाणिस्तानात रहायचे, तर इस्लाम स्वीकारणे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *