Menu Close

शरणार्थी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारल्याने २ सहस्र हिंदू पुन्हा पाकिस्तानमध्ये गेले

पाकमधील हिंदूंना नागरिकत्व देण्यामध्ये येणार्‍या अडचणी भाजपने सोडवाव्यात !

नवी देहली : गेल्या ३ वर्षांत अनुमाने २ सहस्र पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारल्याने त्यांना पुन्हा पाकमध्ये जाणे भाग पडल्याची माहिती समोर आली आहे.

१. पाकिस्तानात अल्पसंख्यांक असणार्‍या हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले जात असून त्यांचे धर्मांतर होत आहे. या छळाला कंटाळून अनेक हिंदू धार्मिक व्हिसावर भारतात येतात. ते भारतात शरणार्थी म्हणूनच येत असतात. त्यांना भारताचे नागरिक होऊन रहाण्याची इच्छा असते आणि येथे राहिल्यावर त्यांचे आयुष्य सुलभ होईल, अशी त्यांची अपेक्षा असते.  त्यासाठी ते पाकमधील सर्वकाही सोडून आलेले असतात; मात्र भारतातील कायदे आणि प्रशासन यांमुळे त्यांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

२. भाजपने यापूर्वीच पाक आणि बांगलादेश येथून आलेल्या हिंदूंना नागरिकत्व देण्याचे घोषित केले होते; मात्र प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे, हे यातून समोर आले आहे.

३. भारतातून अशा प्रकारे परत गेलेल्या हिंदूंना तेथे आणखी अत्याचारांना सामोरे जावे लागते, तसेच अनेकांना इस्लाम स्वीकारणे भाग पाडले जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *