Menu Close

माझे सुरक्षारक्षक मोबाईलवर गेम खेळत बसतात : अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने दिलेल्या सुरक्षा रक्षकांबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र त्यांनी सरकारला लिहिले आहे. सुरक्षारक्षक बेपर्वा असून, मोबाईलमध्ये दंग असलेल्या सुरक्षा रक्षकांना मला कोणी मारून गेले तरी कळणार नाही असा आरोप अण्णा हजारेंनी केला आहे.

मी सकाळी बाहेर जाताना, योगासने करताना या अंगरक्षकांपैकी कुणीही हजर नसतो, कित्येकवेळा ते उशीरा येतात किंवा झोपेतच असतात. त्यांचा बराच वेळ मोबाईल चॅटिंग करण्यात, गेम खेळण्यात निघून जातो त्यामुळे मला खरंच कुणी खोलीत येऊन ठार केले तर यांना ते समजणारही नाही, असा आरोपही अण्णांनी केला आहे. माझ्या अडीच हजार लोकवस्तीच्या राळेगणसिद्धी मध्ये ९ अंगरक्षक व २८ पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी बाळगणे हे सोपे काम नाही. शिवाय सुरक्षा वाढवल्यामुळे सरकारवर खर्चाचा बोजा वाढतोय, तो ही कमी करता येईल.

गेल्या वर्षात सातत्याने अण्णा हजारे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सरकारने त्यांना झेड सुरक्षा दिली आहे. पण अण्णांनी पुन्हा एकदा त्यांचे संरक्षण काढून घेण्याची मागणी केली आहे. या संरक्षणाचा मला काहीच उपयोग होत नाही असे अण्णांनी म्हटले आहे. सुरक्षा रक्षक आणि पोलीस फक्त वेळकाढूपणा करतात असा आरोपही त्यांनी या पत्रामध्ये केला आहे.

भारत पाक युद्धात मरणाशी माझी गाठ पडली होती. त्यामुळे आता मिळाले आहे ते आयुष्य मी बोनस समजतो, असे सांगत आण्णांनी सरकारने माझी सुरक्षाव्यवस्था काढून घ्यावी मला त्याची गरज नाही अशी विनंती केली आहे.

संदर्भ : आयबीएन लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *