Menu Close

देहली येथील कर्मयोगी अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली !

अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

नवी देहली : हिंदु जनजागृती समितीने देहली येथे २१ सप्टेंबरला आयोजित केलेल्या अधिवक्ता अधिवेशनामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे घोषित केले. अधिवक्ता सत्यप्रकाश आर्य हे देहलीतील जनकपुरी येथील आर्य समाज मंदिराचे उपाध्यक्ष आहेत. निरपेक्ष राहून कर्म करत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

अधिवक्ता आर्य यांचे सनातनच्या कार्याला नेहमीच सहकार्य असते. सनातनच्या साधकांवर त्यांचे विशेष प्रेम आहे. ते रहात असलेल्या भागात साधक कधी सेवेनिमित्त आल्यास त्यांनी ‘आमच्या घरी भोजन करून जावे’, असे सर्व साधकांना सांगून ठेवलेले आहे. साधकांशी त्यांची इतकी जवळीकता निर्माण झाली आहे की, सनातन संस्थेशी त्यांचा संबंध काही मासांपूर्वीच आला आहे, असे न वाटता त्यांचा संबंध फार पूर्वीपासूनचा आहे, असेच साधकांना वाटते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *