Menu Close

शिर्डी संस्थानकडून सरकारने घेतलं ५०० कोटींचं कर्ज

  • मंदिर सरकारीकरणाच्या अनेक दुष्परिणामांपैकी हा अजून एक दुष्परिणाम ! 
  • कुठे मंदिरांना दान देणारे पूर्वीचे हिंदू राज्यकर्ते, तर कुठे मंदिरांकडूनच कर्ज घेणारे आताचे ‘धर्मनिरपेक्ष’ राज्यकर्ते ! ‘धर्मनिरपेक्ष’ सरकारे केवळ हिंदूंच्या मंदिरांकडूनच निधी का घेतात ? मशिदी आणि चर्चकडून निधी घेण्याची ‘हिंमत’ ही सरकारे दाखवणार का ?
  • मंदिरांकडून कर्ज घेण्यापेक्षा विविध घोटाळे करत असलेल्या भ्रष्टाचारी राजकारणी, अधिकारी इत्यादींपेक्षा काळा पैसा बाहेर काढला तर सरकार आता आहे ते कर्जदेखील फेडू शकते ! असे करण्याची ‘हिंमत’ सरकार का दाखवत नाही ?

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून ५०० कोटींचं बिनव्याजी कर्ज घेतलं आहे. हा निधी राज्य सरकार अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी साई संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती. शिर्डी साई संस्थानचे प्रमुख सुरेश हावरे यांनी निर्णय घेत राज्य सरकारला हे कर्ज मंजूर केलं. राज्य सरकारने आतापर्यंत इतकं मोठं कर्ज कुठल्याही संस्थेकडून घेतलेलं नाही. ही पहिलीच वेळ आहे. तसंच हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही.

गेल्या १ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याचा प्रस्ताव शिर्डी साई संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी मंजुरी दिली. दोन टप्प्यात हे कर्ज राज्य सरकारला दिलं जाणार आहे. शिर्डी साई संस्थान आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळात याबाबत करार करण्यात आला. साई संस्थानच्या इतिहासात हे प्रथमच घडलं, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

निळवंडे सिंचन प्रकल्पाचं काम बऱ्याच कालावधीपासून रखडलं आहे. या प्रकल्पाचा खर्च हा १२०० कोटी इतका आहे. यासाठी शिर्डी संस्थानने ५०० कोटींचं कर्ज दिलं आहे. तर जलसंपदा विभागाला यासाठी आर्थसंकल्पातून ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसंच या प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात ४०० कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात सिंचन प्रकल्पाचा डावा आणि उजवा कलवा बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

शिर्डीत दररोज ७० हजार भाविक साई बाबांच्या दर्शनाला येतात. उत्सवाच्या काळात ही संख्या साडेतीन लाखाच्यावर जाते. पण त्याभागात पाण्याची मोठी टंचाई आहे. यामुळे निळवंडे सिंचन प्रकल्पाद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. अकोला, संगमनेर, राहुरी, कोपरगाव आणि शिर्डी या तालुक्यांना आणि इतर गावांना प्रकल्पाचा फायदा होणार आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं. शिर्डी साई संस्थानने यापूर्वी सरकारी रुग्णालयासाठी ७१ कोटींचा निधी दिला होता. पण आता प्रथमच साई संस्थानने जनतेच्या हिताचा विचार करत ५०० कोटींचं व्याजमुक्त कर्ज सरकराला दिलं, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *