Menu Close

हिंदूंनी संघटित होणे ही काळाची आवश्यकता : राजेंद्र पावसकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची नेरूळ (नवी मुंबई) येथे एकवक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

नवी मुंबई : सरकार केवळ हिंदूंच्या मंदिरांच्या पैशावर डोळा ठेवून ती कह्यात घेते; मात्र अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांना हात लावण्यास धजावत नाही, असे सरकार राममंदिर कधी उभारू शकेल का ? ख्रिस्ती मिशनरी गरीब हिंदूंचे धर्मांतर करतात. मुसलमान ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राद्वारे पद्धतशीरपणे हिंदूंच्या मुली पळवत आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पावसकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सारसोळे गाव, नेरूळ येथील श्री गणेश मंदिरात ८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एकवक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ५५ धर्मप्रेमी उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेनेचे उपनेते आणि राज्यमंत्री (झोपडपट्टी पुनर्वसन) श्री. विजय नाहटा, तसेच श्री. विठ्ठल मोरे यांसह स्थानिक पातळीवरील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. श्री गणेश मंदिराचे विश्‍वस्त श्री. कैलास पाटील यांनी सभेसाठी लागणारे सभागृह, ध्वनीक्षेपक यंत्रणा, विद्युत व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *