Menu Close

भारताच्या कारवाईमध्ये जैश-ए-महंमदची मोठी हानी !

मसूद अझहर याच्या भावाची स्वीकृती

  • भारताने निर्जनस्थळी बॉम्ब फेकल्याचे म्हणणार्‍या पाकला आणि त्याच्या सैन्याला जैशने दिलेला हा घरचा अहेरच होय ! यामुळे आता यावर प्रश्‍न विचारणार्‍या आणि पुरावे मागणार्‍या भारतातील राष्ट्रघातकी वृत्तीच्या राजकीय पक्षांनाही यातून चपराक मिळाली आहे !
  • पाकचा खोटारडेपणा तो स्वतःच आणि त्याचे आतंकवादीच समोर आणत आहेत, हेच यातून पुन्हा एकदा समोर आले आहे !    

नवी देहली : भारताने जैश-ए-महंमदच्या आतंकवादी प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या कारवाईमध्ये या केंद्राची मोठी हानी झाली आहे, असे जैशचा प्रमुख मसूद अझहर याचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने म्हटले आहे. पेशावर येथील एका जाहीर सभेमध्ये त्याने हे विधान केले आहे. अम्मार याने म्हटले आहे की, भारतीय विमानांनी जैशच्या तळावर आक्रमण केल्याने ते उद्ध्वस्त झाले आहे. शत्रूने युद्ध पुकारले आहे. भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही यंत्रणेच्या मुख्यालयाला लक्ष्य केलेले नाही. त्यांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्ब फेकलेले नाहीत. काश्मीरमधील मुसलमानांच्या साहाय्यासाठी त्यांनी आमच्या केंद्रांवर आक्रमण केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *