Menu Close

धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’साठी मानवी साखळी ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

सामाजिक बांधीलकीतून राबवल्या जाणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमाचे यंदाचे १७ वे वर्ष !

डावीकडून कु. क्रांती पेटकर, बोलतांना श्री. पराग गोखले आणि प्रा. विठ्ठल जाधव

पुणे : धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयाच्या पाण्यात उतरणार्‍या आणि पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदूषित करणार्‍या युवक-युवतींवर प्रतिबंध बसावा; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यंदाच्या वर्षीही ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत कार्यकर्ते मानवी साखळी करून खडकवासला जलाशयाच्या भोवती थांबून पाण्यात उतरू पहाणार्‍यांचे प्रबोधन करतात. सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेपोटी राबवल्या जाणार्‍या या उपक्रमाचे यंदाचे हे १७ वे वर्ष आहे. हिंदु जनजागृती समिती, अन्य समविचारी संघटना, ग्रामस्थ आणि पोलीस-प्रशासन यांचाही या उपक्रमात सहभाग असतो. यंदा २१ मार्च आणि २५ मार्च या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत हे अभियान राबवले जाणार असून त्यामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पुणे समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केले. १८ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर याही या वेळी उपस्थित होत्या. सातत्यपूर्ण प्रबोधनामुळे गेली अनेक वर्षे हे अभियान १०० टक्के यशस्वी होत आहे. ‘कमिन्स इंडिया’ हे आस्थापनही मोहिमेत सहभागी होणार आहे.

‘धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांच्या वेळी पाण्याने भरलेले फुगे महिलांवर फेकणे, बळजोरीने रंग लावणे, अश्‍लील अंगविक्षेप करणे, असे चुकीचे प्रकार होत असून त्याला आळा बसण्याची आवश्यकता आहे’, असे मत कु. क्रांती पेटकर यांनी प्रदर्शित केले, तर प्रा. विठ्ठल जाधव यांनी रंगपंचमी आणि धूलिवंदन या उत्सवांमागील धर्मशास्त्र सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *