Menu Close

आज मानवासमोर असलेल्या सर्व भीषण समस्यांचे मूळ कारण अधर्माचरण आहे : प्रकाश मालोंडकर

हिंजिलीकट, ओडिशा येथे राष्ट्र आणि धर्म रक्षण विषयावर प्रवचन

राऊरकेला : आज संपूर्ण जगभर भ्रष्टाचार, हिंसाचार, अत्याचार, अनीती, असुरक्षितता पसरली आहे. या सर्व समस्यांचे मूळ मानवाच्या अधर्माचरणामध्ये आहे. आजचा मनुष्य स्वत:ला, परिवाराला, समाजाला, राष्ट्राला घातक आहे, अशा कृती बिनदिक्कत करतो वा त्या होत असतांना मूक साक्षीदार म्हणून पहातो. याचे भीषण परिणाम आज सर्वांनाच भोगावे लागत आहेत. भविष्यात याची परिणती विनाशाकडे होईल. यासाठी धर्म काय, अधर्म काय याचा विचार करून प्रत्येक कृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मालोंडकर यांनी हिंंजिलकट येथे ‘डिव्हाइन लाईफ सोसायटी’ द्वारा आयोजित प्रवचनात केले.

हिंजिलीकट येथील डिव्हाइन लाईफ सोसायटीच्या आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्र-धर्म विषयक प्रवचनात बोलतांना श्री. मालोंडकर यांनी दैनंदिन जीवनात धर्माचरण करण्याची आवश्यकता आणि त्यासाठी धर्मशिक्षणाचे किती महत्त्व आहे हे विशद् केले. यासमवेत हिंदू संघटित होणे आणि अशा संघटित हिंदूंनी राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करणे किती आवश्यक आहे, याविषयी विश्‍लेषण केले.

क्षणचित्रे

  • प्रयाग येथील कुंभमेळ्यामध्ये आयोजित सनातन ग्रंथ-वस्तू प्रदर्शनाला गावातील जिज्ञासूंनी भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी त्यांच्या गावात येण्याचे निमंत्रण दिले होते. यांपैकी श्री. लक्ष्मी पंडा यांना संपर्क केला असता त्यांनी या प्रवचनाचे आयोजन केले.
  • प्रवचनाला सुमारे ६० स्त्री-पुरुष उपस्थित होते. त्यांपैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक संख्येने स्त्रिया होत्या.
  • प्रवचन झाल्यावर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद झाल्यावर संपूर्ण सभागृह उपस्थित स्त्री-पुरुषांनी पुन्हा स्वच्छ केले. सर्व गोष्टींमध्ये त्यांची तळमळ आणि उत्साह दिसत होता.
  • धर्मशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यासाठी उपस्थितांनी मागणी केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *