Menu Close

जोधपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक !

  • ३ दुचाकी गाड्या जाळल्या

  • पोलिसांच्या गाडीची तोडफोड

काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणार, यात नवल काहीच नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !

जोधपूर (राजस्थान) : येथील सूरसागर भागामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. हे हिंदू श्रीरामाच्या घोषणा देत परतत असतांना तोंडवळा झाकलेल्या काही धर्मांधांनी येथील मोहल्ल्यातून त्यांच्यावर दगडफेक केली. तसेच त्यांनी येथील ३ दुचाकींना आग लावली. या ठिकाणांपासून काही अंतरावर पोलीस तैनात होते. त्यांनी धर्मांधांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांची संख्या अल्प पडत होती. यानंतर अतिरिक्त पोलीसबळ आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली; मात्र तोपर्यंत काही जण घायाळ झाले. (पोलीस जवळ तैनात असतांनाही धर्मांध अशा प्रकारे दगडफेक करण्याचे धारिष्ट्य करतात, यावरून त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस साहाय्यक आयुक्तांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. पोलिसांनी दगडफेक करणार्‍या धर्मांधांना घरात घुसून पकडले. या घटनेच्या २ दिवस आधीही धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून हिंसाचार करण्यात आला होता.

मूकदर्शक पोलीस !

या घटनेच्या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात घरांच्या छतांवरून धर्मांधांकडून दगडफेक करण्यात येत होती. या वेळी पोलीस त्यांना पकडण्यापेक्षा मूकदर्शक असल्याचे दिसत आहे. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. (हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात ! अशा पोलिसांवर निष्क्रीय राहिल्याच्या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *