Menu Close

देशद्रोहाच्या विरोधात कठोर कायदा करून संपूर्ण देशभर लागू करावा : हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

हिंदु जनजागृती समितीचे गोरखपूर येथे शासनाला निवेदन

गोरखपूर (उत्तरप्रदेश) : पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय सेैन्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देश उभा राहिला असतांना काही धर्मांध आणि त्यांच्या संघटना जाणीवपूर्वक पाकचे झेंडे फडकावत आहेत, तसेच पाकच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत. या देशद्रोही कृत्याच्या विरोधात जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशात कठोर आणि प्रभावी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता शेष नारायण पांडेय, श्री. लक्ष्मीचरण शुक्ला, श्री. प्रेमशंकर त्रिपाठी, श्री. प्रशांत वैती, श्री. गौतम श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *