धर्माचरण केल्याने आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते : सौ. सुगंधी जयकुमार, हिंदु जनजागृती समिती
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/06/Sugandhi_Jaykumar_Sept2017_320.jpg)
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/06/Curious-students_clr.jpg)
चेन्नई : येथील जी.के. शेट्टी विवेकानंद विद्यालयाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दीक्षा शिबिरात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ‘हिंदु संस्कृती’चे आणि नामजपाचे महत्त्व विशद केले. ‘धर्माचरण केल्याने आणि आचारधर्माचे पालन केल्याने आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होते’, असे सौ. जयकुमार यांनी सांगितले.
शाळेतील अनुमाने १८४ विद्यार्थी आणि १२ शिक्षक यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार यांचा शाळेच्या प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सनातनच्या ग्रंथांचा संच शाळेसाठी लवकरच विकत घेणार असल्याचेही प्राचार्यांनी या वेळी सांगितले.