Menu Close

जसापूर (अमरावती) येथे एक दिवसीय शौर्य जागरण शिबिर पार पडले

शिबिरात मार्गदर्शन करतांना श्री. निरंजन चोडणकर आणि समवेत श्री. हर्षद खानविलकर

अमरावती : जिल्ह्यातील जसापूर या गावात २८ जुलै या दिवशी समितीच्या स्वरक्षा प्रशिक्षणवर्गात येणार्‍या युवक आणि युवती यांसाठी एक दिवसीय शौर्य जागरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गावातील ३२ युवक-युवती सहभागी झाल्या होत्या.

या शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर आणि श्री. हर्षद खानविलकर यांनी आपत्काळात साधनेचे महत्त्व आणि शौर्य जागरणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. स्वरक्षणाचे विविध प्रायोगिक भागही शिबिरात शिकवण्यात आले. शिबिराच्या शेवटी काही धर्मप्रेमींनी शिबिरात आम्हाला साधनेचे महत्त्व समजले. उत्साह जाणवला. धर्मकार्य करण्याची दिशा मिळाली, असे मनोगत व्यक्त केले.

विशेष : जसापूर गावातील २१ धर्मप्रेमी गुरुपौर्णिमेला अमरावती शहरात आले होते. त्या वेळी त्यांनी त्यांच्या गावात शिबिर घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि लगेचच त्याचे नियोजन केले. शिबिराचे आयोजन, पूर्वसिद्धता इत्यादी सेवा त्यांनीच पुढाकार घेऊन केल्या. शिबिरार्थींनी आसपासच्या गावांमध्ये जाऊन प्रसारकार्य करण्याचा निश्‍चयही या वेळी केला.

क्षणचित्र : गावातील एका धर्मप्रेमीच्या घरी कार्यक्रमाच्या पूर्वी नुकतेच बाळाचे निधन झाले होते. शिबिर मंदिरात होते. तरीही ते दिवसभर शिबिर ऐकता यावे यासाठी ते मंदिराच्या बाहेर बसून होते. त्यांनी संपूर्ण शिबिर ऐकले. धर्मकार्याचे शिबिर असल्याने मी आलो, असे ते या वेळी म्हणाले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *