Menu Close

कल्याण आणि अंबरनाथ येथे भाजप सरकारच्या अभिनंदनासाठी कार्यक्रमाचे आयोजन

हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी विजय साजरा करतांना राष्ट्र आणि धर्म प्रेमी

कल्याण : कलम ३७० आणि ३५ अ रहित करून ७० वर्षांच्या जोखडातून काश्मीरला मुक्त करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. यानिमित्त सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कल्याण येथील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता विवेक भावे, भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके आदी धर्माभिमानी उपस्थित होते.

अंबरनाथ (पूर्व) येथील हुतात्मा चौकात रात्री ८ वाजता हुतात्मा स्मारकाला हार अर्पण करून सरकारचे अभिनंदन आणि विजय साजरा करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, बजरंग दल, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवाजी चौकातही जल्लोष साजरा करून लाडू वाटप करण्यात आले. ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *