Menu Close

बांगलादेशामध्ये ५० हून अधिक धर्मांध गुंडांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

बांगलादेशामध्ये हिंदु असुरक्षित !

ढाका : बांगलादेशाच्या पटुअलहाली जिल्ह्यातील दशमिना उपजिल्ह्यामध्ये २५ ऑगस्ट २०१९ या दिवशी जहीर बाहिनीच्या ५० हून अधिक धर्मांध गुंडांनी हिंदु कुटुंबियांवर आक्रमण केेले. या आक्रमणात १० पेक्षा अधिक हिंदु महिला आणि मुले गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना उपचारासाठी येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या आक्रमणाच्या विरोधात दशमिना पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आल्याचे दशमिना पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍याने सांगितले. याविषयीचे वृत्त बांगलादेशमधील दैनिक स्टारमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या वतीने पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित हिंदु कुटुंबियांशी चर्चा केली. आम्हाला पुरेसा वैद्यकीय उपचार मिळत नाही, असे त्यांनी पू. घोष यांना सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *