![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/09/jalgaon_18_sept.jpg)
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/09/bhusaval_18_Sept.jpg)
जळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ सप्टेंबर या दिवशी जळगाव जिल्हाधिकारी यांना, तर भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी यांना विविध विषयांवरील निवेदन देण्यात आले. यात ‘आंध्रप्रदेश सरकारच्या वतीने हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेले धार्मिक आक्रमण रोखणे’, ‘देहली विश्वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास काळे फासणार्या अक्षय लकडाला अटक व्हावी’ आणि ‘राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी’ या मागण्या करण्यात आल्या. या वेळी पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या सुरक्षेच्या नावाखाली सरकारने तेथील प्राचीन मठ आणि मंदिरे यांना बेकायदा ठरवून ती पाडण्याची अयोग्य कारवाई रोखण्यासह देशभर समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली. भुसावळ येथे निवेदन देतांना शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. उमाकांत शर्मा, धर्मप्रेमी श्री. शुभम पचरवाल, श्री. सचिन बडगे आदी उपस्थित होते.
वणी (यवतमाळ) येथे प्रशासनाला निवेदन
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2019/09/lahu_thu_1_nivedan_batmi.jpg)
वणी (यवतमाळ) येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना १९ सप्टेंबरला वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.