![](https://www.esakal.com/esakal/20150302/images/5393878277786069053/5530018179120734279_Org.jpg)
डेहराडूनमध्ये झालेल्या विहिंपच्या कार्यक्रमात बोलताना साध्वी यांनी धर्मांतर व लव्ह जिहाद याचा बॉलिवूडशी संबंध असल्याचे सांगितले. साध्वी म्हणाल्या, “शाहरुख, सलमान व आमीर खान लव्ह जिहादसाठी जबाबदार आहेत. हिंदू नागरिकांनी या तिन्ही खानांचे चित्रपट पाहू नये तसेच यांची छायाचित्रेही आपल्या घरात लावू नयेत. या तिन्ही खानांच्या चित्रपटांमुळे आपल्या मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत. घरात असलेली यांची छायाचित्रे होळीमध्ये जाळून टाका.‘‘
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही सल्ला देताना साध्वी म्हणाल्या, की सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी-वद्रा या खूप दुःखी असून, राहुल यांनी आता एका भारतीय मुलीशीच विवाह करायला पाहिजे.
स्त्रोत : सकाळ