Menu Close

अशिलाची बाजू स्थिरपणे मांडता येण्यासाठी साधनेचे बळ आवश्यक ! – वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

रामनाथ (अलिबाग) येथील धर्मप्रेमी अधिवक्त्यांंसाठी मार्गदर्शन

विषय मांडतांना वैद्य उदय धुरी आणि उपस्थित अधिवक्ते

रामनाथ (जिल्हा रायगड) : दैनंदिन व्यवहार करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचे दायित्व पार पाडतांना आपल्या अशिलाची बाजू स्थिर आणि अभ्यासपूर्वक मांडता येण्यासाठी साधनेचे बळ असणे आवश्यक आहे. कुलदेवतेची उपासना आणि नामजप यांनी आपली व्यावहारिक अन् आध्यात्मिक उन्नती साधता येते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी अधिवक्त्यांंसाठी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयांवर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

क्षणचित्रे

१. मार्गदर्शनानंतर अधिवक्त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.

२. ‘आजपासून नामजप करण्यास चालू करतो’, असे सर्वांनी सांगितले.

३. ‘हा विषय अधिक अधिवक्त्यांपर्यंत पोचायला हवा’, असे एका अधिवक्त्यांनी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *