Menu Close

हिंदूंनी धर्माचरण केल्यासच त्यांच्या सर्व समस्या संपतील ! – योगेश ठाकूर

मार्गदर्शन करतांना श्री. योगेश ठाकूर

कोपरखैरणे : हिंदु हा केवळ कौटुंबिक समस्यांनी नव्हे, तर व्यावहारिक समस्या, तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांमुळे अडचणीत येत आहे. केवळ धर्माचरणानेच हिंदूंच्या सर्व समस्या सुटतील. त्यामुळे सर्वांना धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी येथील सेक्टर ४ च्या श्री वरदविनायक मंदिराच्या प्रांगणात केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी केले. कार्यक्रमासाठी स्थळ उपलब्ध करून दिल्यासाठी श्री वरदविनायक विश्‍वस्त मंडळ, तसेच आसनव्यवस्था आणि टेबल पुरवल्यासाठी नगरसेविका सौ. सायली शिंदे यांचे आभार मानण्यात आले.

उपस्थित मान्यवर

माजी नगरसेवक श्री. सुरेश सालदार, नवी मुंबईचे भाजपचे जिल्हा सचिव अप्पा मुळे, सामाजिक कार्यकर्ते मारुति सकपाळ आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजय बर्गे

अभिप्राय

वक्त्यांचे मार्गदर्शन चांगले झाले. त्यांचा विषयांचा अभ्यास चांगला होता. त्यांनी संतवचनाचे प्रमाण दिले. मार्गदर्शनात सांगितल्याप्रमाणे हिंदु ऐक्याची आवश्यकता आहे. – श्री. आनंदा वाशिवले, श्री वरदविनायक विश्‍वस्त मंडळ

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *