Menu Close

साधूंची हत्या करणार्‍या दोषींना कठोर शिक्षा करावी ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

द्वारका (गुजरात) : महाराष्ट्रातील पालघर येथे २ साधूंची झालेली हत्या जघन्य आणि निंदनीय आहे. ही हत्या करणार्‍यांना कोणतीही भीती नव्हती आणि त्यांनी अत्यंत अमानवीय पद्धतीने साधूंना ठार मारले. अशा प्रकारची वृत्ती केवळ आतंकवाद्यांमध्येच असते. या घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित होते, याहून मोठे अराजकतेचे दुसरे उदाहरण कुठले असेल ?, अशा शब्दांत द्वारका आणि ज्योतिष या पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी पालघरमधील घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी पत्रत काढले आहे. या पत्रकात त्यांनी पुढे लिहिले आहे की, ही घटना द्वारका पीठाच्या धार्मिक क्षेत्रामध्ये घडलेली असल्याने आम्ही महाराष्ट्र सरकारला पत्राच्या माध्यमांतून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहोत.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *