Menu Close

भारताच्या विरोधात जिहाद करण्यासाठी शस्त्र हाती घ्या ! : अल् कायदाचे भारतीय मुसलमानांना आवाहन

भारतात मुसलमानांशी भेदभाव आणि त्यांचा नरसंहार होत असल्याचा खोटा आरोप

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ हेच या आवाहनातून पुन्हा एकदा स्पष्ट होते. तरीही भारतातील तथाकथित निधर्मीवादी ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असा ‘गोबेल्स’ पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत रहाणार, हेही तितकेच खरे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले आहे. ‘भारतात मुसलमानांशी भेदभाव करण्यासह त्यांचा नरसंहार होत आहे’, असे सांगत हे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), काश्मीर आणि देहली दंगल यांचा हवाला देण्यात आला आहे.

अल् कायदाच्या आवाहनामागे पाकिस्तान !

जोपर्यंत पाकचा नायनाट केला जात नाही, तोपर्यंतअसे प्रकार चालूच रहाणार आहेत, हे लक्षात घ्या !

याविषयी भारतीय संरक्षण यंत्रणांनी म्हटले आहे की, अल् कायदाची मध्यपूर्वेतील शाखा आणि पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. यांच्यातील संबंधांमुळेच अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.

कारण सीएएच्या विरोधात पाकमधील सामाजिक माध्यमांद्वारे केल्या जाणार्‍या प्रचाराला अल् कायदाकडून समर्थन दिले जात आहे. आखाती देशांशी असलेले भारताचे चांगले संबंध कसे बिघडवता येतील, यासाठीच हा प्रयत्न आहे. आम्ही आतापर्यंत पाकमधील २ सहस्र ७९४ ट्विटर खात्यांची ओळख पटवू शकलो आहोत ज्याद्वारे अल् कायदाचे अशा प्रकारचे आवाहन प्रसारित करण्याचा प्रयत्न झाला आहे. भारतातील काही जण या खोट्या प्रचाराला बळी पडतात. आखाती देशातील लोकही अशा अपप्रचाराला बळी पडत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *