Menu Close

आसाममध्ये क्षुल्लक कारणावरून ५ धर्मांधांनी केलेल्या मारहाणीत हिंदु भाजी विक्रेता ठार

  • हिंदूंना असहिष्णु ठरवून त्यांच्यावर टीका करणारे निधर्मीवादी आणि पुरस्कार वापसी टोळी आता कुठे आहे ?
  • अशी घटना एखाद्या मुसलमानाच्या संदर्भात अन्य धर्मियांकडून घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती आणि एकजात साम्यवादी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी हिंदूंवर तुटून पडले असते, हे लक्षात घ्या !

गौहत्ती (आसाम) : आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत त्याची हत्या केली.

सनातन डेका सायकलवरून भाजी विकण्याचा व्यवसाय करत होते. मनाहकुची गावात तेे भाजी विकत असतांना त्यांच्या सायकलची एका दुचाकी वाहनाला धडक बसली. दुचाकी वाहनावरील फैजुल अली आणि लाजिल अली यांना त्याचा राग आला आणि त्यांनी सनातन यांना मारहाण केली. नंतर त्यांनी त्यांच्या काही सहकार्‍यांना बोलावले आणि सर्वांनी मिळून सनातन यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *