Menu Close

हिंदूंनी पुढील पिढीच्या भवितव्यासाठी धर्मरक्षण करणे अत्यावश्यक ! – महर्षि श्री श्री आनंद गुरुजी

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु धर्मजागृती सभा

bengluru_sabha
व्यासपिठावर उपस्थित डावीकडून कु. भव्या गौडा, अधिवक्ता अमृतेश एन्.पी., सभेला संबोधित करताना महर्षि श्री श्री आनंद गुरुजी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर

बेंगळुरु – राष्ट्रीय समस्या आपल्याला आपल्या वाटल्या पाहिजेत. केवळ मनोरंजनात रममाण होणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय नाही. प्रत्येक हिंदूने धर्माचरण करण्यास प्रारंभ करायला हवा. त्यानेच धर्मरक्षण होणे संभव आहे. जर आपण राष्ट्र आणि धर्म यांकडे दुर्लक्ष करत राहिलो, तर पुढील २ पिढ्यांना आपल्याला भारत माता की जयचा जयघोष करणे ही अशक्य होईल. आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी धर्मरक्षण करणे अत्यावश्यक झाले आहे, असे प्रतिपादन महर्षि श्री श्री आनंद गुरुजी यांनी केले. बेंगळुरूमध्ये हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला संबोधित करतांना गुरुजी बोलत होते. शहरातील अच्चुकट्टू क्षेत्रात असलेल्या चेन्नम्माकेरे येथे अन्नपूर्णा कल्याण मंडपात या धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी बेंगळुरू उच्च न्यायालयाचे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अमृतेश एन्. पी. यांनी धर्माभिमान्यांना संबोधित करतांना कर्नाटकातील काँग्रेस शासनाला चेतावणी देत म्हटले, जर हिंदुविरोधी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक संमत करण्यात आले, तर तुम्हाला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल. अंधश्रद्धेच्या नावाखाली अन्य धर्मातील रुढी-परंपरांना खंडित करण्याची काँग्रेस शासनामध्ये हिंमत आहे का ? विधेयकाच्या भयावहतेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, जर हे विधेयक अस्तित्वात आले, तर हिंदूंना संतांची पाद्यपूजाही करता येणार नाही. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे शिवमोग्गा जिल्हा समन्वयक श्री. विजय रेवणकर आणि सनातन संस्थेच्या कु. भव्या गौडा यांनी सभेला उपस्थित धर्माभिमान्यांना संबोधित करतांना हिंदुसंघटन आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व विशद करून सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *