Menu Close

पाकमधील भारतीय दूतावासातील २ कर्मचार्‍यांना लोखंडी सळीने मारहाण

रात्री उशिरा केली सुटका

अशा घटनांतून पाकची भारतद्वेषी आणि विकृत मानसिकता पुन्हा एकदा स्पष्ट झाली. आता तरी भारत सरकारने पाकला जन्माची अद्दल घडवणे आवश्यक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : येथे १५ जून या दिवशी भारतीय दूतावासामधील २ कर्मचार्‍यांना पाकच्या पोलिसांनी एका कथित अपघाताच्या प्रकरणी अटक केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आणलेल्या दबावानंतर या कर्मचार्‍यांना रात्री उशिरा दूतावासात पुन्हा नेऊन सोडण्यात आले; मात्र दिवसभरात या कर्मचार्‍यांचा चौकशीच्या नावाखाली प्रचंड छळ करण्यात आला. या कर्मचार्‍यांना लोखंडी सळीने मारहाण करण्यात आली.

या कर्मचार्‍यांना १५ हून अधिक सशस्त्र सुरक्षारक्षकांनी पकडून नेले होते. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती आणि हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या. त्यांना अज्ञातस्थळी नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच घाणेरडे पाणी पाजण्यात आले. चौकशीत या कर्मचार्‍यांकडून भारतीय दूतावासातील प्रत्येक अधिकार्‍याच्या कामाविषयी माहिती विचारण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *