Menu Close

(म्हणे) ‘गलवान खोरे आमचेच असून भारत तेथे बलपूर्वक रस्ता आणि पूल बनवत आहे !’ – चीनचा दावा चालूच

‘एक खोटे १० वेळा बोलले की, ते खरे वाटते’, असे म्हटले जाते; मात्र चीनने कितीही वेळा खोटा दावा केला, तरी ते सत्य होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

बीजिंग : गलवान खोरे हा चीनचा भाग आहे. तो प्रत्यक्ष नियंत्रणरेषेकडून आमच्या दिशेला आहे. अनेक वर्षांपासून आमचे सैनिक येथे गस्त घालत त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. भारत येथे बलपूर्वक रस्ता आणि पूल बनवत आहे. १५ जूनला झालेल्या संघर्षाला भारताच उत्तरदायी आहे, असा पुनरूच्चार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाऊ लिजियन यांनी केला. यापूर्वी चीनच्या वेगवेगळ्या अधिकार्‍यांनीही ४ वेळा ‘भारताने प्रत्यक्ष नियंत्रणरेषा पार करून चीनच्या सैनिकांवर आक्रमण केल’, अशी गरळओक केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *