Menu Close

धर्मांधाच्या चिथावणीमुळे ‘कपूर प्रजापती’ बनला ‘कासिफ’ : स्वतःच्या अल्पवयीन मुलींचा करणार होता निकाह

हिंदुत्वनिष्ठांकडून अल्पवयीन मुलींची सुटका

  • हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते !
  • धर्मांतर होण्यापासून अल्पवयीन हिंदु मुलींचे रक्षण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन. सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा !

मथुरा (उत्तरप्रदेश) – तैयब नावाच्या धर्मांधाच्या चिथावणीमुळे ‘कपूर प्रजापति’ याने धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला. यानंतर तो ‘कासिफ’ बनला. एवढेच नव्हे, तर तो स्वतःच्या दोघा अल्पवयीन मुलींचा मेवात येथील दोन मुसलमान युवकांशी निकाह लावून देणार होता. याविषयी माहिती मिळताच काही हिंदुत्वनिष्ठांनी सदर मुलींची सुटका केली, तसेच प्रजापतीला थेट कारागृहाचा रस्ता दाखवला. तथापि या प्रकरणी प्रजापतीचे धर्मांतर करणारा तैयब अद्याप फरार आहे.

प्रजापती यांच्या वहिनी महेंद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मथुरेहून ५० कि.मी. दूर ‘मडोरा’ नावाचे मुसलमानबहुल गाव आहे. अनुमाने २० वर्षांपूर्वी प्रजापतीने २ मुली आणि १ व्यक्ती यांना मारले होते. त्या वेळी गावातील काही धर्मांधांनी त्याला ‘तू जर मुसलमान बनलास, तर तुझ्यावर कुठलाही गुन्हा नोंद होणार नाही’, असे सांगितले. यानंतर प्रजापतीने इस्लाम स्वीकारला होता.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *