Menu Close

‘कोरोना वाहक’ बनून भारतावर आक्रमण करा ! – इस्लामिक स्टेटची समर्थकांना चिथावणी

असल्या कोरोना आतंकवाद्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचीच ‘लस’ लागू पडेल, हे लक्षात घेऊन सरकारने त्यानुसार त्यांच्याविरुद्ध धडक कृती करावी !

बगदाद : ‘कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे संधीत रूपांतर करा आणि ‘कोरोना वाहक’ बनून भारतावर आक्रमण करा’, अशी चिथावणी इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेने त्यांच्या समर्थकांना दिली. ‘व्हॉईस ऑफ हिंद’ नावाच्या ‘ऑनलाईन’ प्रकाशन समूहाच्या ‘लोकडाऊन’ विशेषांकात ही चिथावणी देण्यात आली आहे. या १७ पानी अंकाच्या पहिल्या पानावर देहली दंगल आणि देहलीतील मरकजमध्ये सहभागी होणारे तबलिगी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात लिहिले आहे की, ‘(इस्लामवर) विश्‍वसास ठेवणारे उभे रहातील आणि ‘कुफ्र’ संपतील.’ याशिवाय यामध्ये अशांना संपवण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत.

या अंकात पुढे म्हटले आहे की,

१. नेहमी शस्त्रसज्ज रहा आणि अधिकाधिक कुफ्रांना मारा. त्यांना मारण्याची संधी सोडू नका.

२. स्वतःजवळ चेन, तार, कात्री, दोरी आणि हातोडा ठेवा, ज्याद्वारे त्यांना तडफडून मारता येऊ शकेल.

३. कुफ्रांमध्ये अधिकाधिक कोरोना पसरवा. त्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही आणि अधिकाधिक कुफ्रांना सहज मारले जाऊ शकते. (येथे मौलाना साद याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.) कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांमध्येही कोरोना पसरवा.

४. मुसलमानांनी देहली दंगलीच्या प्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांना केलेल्या अटकेचा सूड उगवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *