Menu Close

तणावाच्या स्थितीतून बाहेर पडण्यास साधना करणे आवश्यक : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता संमेलनाचे आयोजन

देहली : आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत अधिवक्त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यात अधिवक्त्यांनाही आर्थिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत ईश्वराचे नामस्मरण करावे. त्यामुळे आत्मबळ जागृत होऊन मन सकारात्मक होते आणि आपण तणावाच्या स्थितीतून बाहेर पडू शकतो. सध्याच्या काळात स्वत: समवेत आपल्या कुटुंबालाही स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहावे लागेल आणि पुढे येणार्‍या कठीण काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध रहावे लागेल. यासाठी साधना करून आपले आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जुलै या दिवशी ‘सध्याच्या काळात अधिवक्त्यांमध्ये वाढता तणाव आणि उपाययोजना’ या विषयावर ‘ऑनलाईन’ अधिवक्ता संमेलन झाले. या संमेलनात सहभागी अधिवक्त्यांना ते संबोधित करत होते. या संमेलनाला देहली, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील अधिवक्ता ‘ऑनलाईन’ उपस्थित होते.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘आपले मन हेच आपल्या तणावाला कारणीभूत असते; परंतु आपण मनाच्या स्थितीसाठी बाह्यस्थितीला दोष देतो. अशा स्थितीत मनाला स्वयंसूचना दिल्यास आपण सध्याच्या तणावपूर्ण स्थितीतून बाहेर पडू शकतो. या संकटकाळात ईश्वराची कृपा आवश्यक आहे. स्वयंसूचनांच्या समवेत नामजपासारखे आध्यात्मिक उपाय केल्याने ईश्वराची आपल्यावर कृपा होते. त्यामुळे आपण संकटावर निश्चित मात करू शकतो.’’ कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.

क्षणचित्रे

१. या वेळी तणावमुक्तीसाठी स्वयंसूचना कशा द्याव्यात, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच अधिवक्त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

२. ‘या संकटापासून तणावविरहित होण्यासाठी आजच्या मार्गदर्शनाचा आम्हाला निश्चित लाभ होईल’, असे सहभागी अधिवक्त्यांनी सांगितले.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *