Menu Close

आपत्काळामध्ये श्राद्धाच्या विविध पद्धतींचा अवलंब करून श्राद्ध करणे आवश्यक : पू. नीलेश सिंगबाळ

वाराणसी (उत्तरप्रदेश) : पितृऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध करणे आवश्यक आहे. श्राद्ध केल्याने संपूर्ण वंशाची शुद्धी होते. आपत्काळामध्ये आमान श्राद्ध, द्रव्य श्राद्ध, गोग्रास दान आदी पद्धतींचा अवलंब करून श्राद्ध करू शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. समितीच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार आणि ओडिशा येथील उद्योगपतींसाठी ऑनलाईन सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी वरील मार्गदर्शन केले. या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने करण्यात आलेल्या विविध आध्यात्मिक संशोधनाविषयीची माहिती दिली. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला अनेक उद्योगपती उपस्थित होते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्हणाले, ‘‘हलाल अर्थव्यवस्था ही हिंदु समाजाला बेरोजगार करण्याचे षड्यंत्र आहे. केरळ राज्यात जाणीवपूर्वक ओणम् सणाच्या निमित्ताने हिंदूंना हलाल प्रमाणित पापड देऊन त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या. त्यामुळे हिंदु व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटन केले पाहिजे.’’ कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *