Menu Close

कानपूर : ‘लव्ह जिहाद’च्या १४ प्रकरणांमध्ये बलपूर्वक धर्मांतर झाल्याचे विशेष अन्वेषण पथकाकडे ठोस पुरावे

कानपूर (उत्तरप्रदेश) : येथील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून चौकशी पूर्ण झाली असून १४ प्रकरणांमध्ये हिंदु तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आल्याचे यात उघड झाले आहे. यातील ५ प्रकरणांचा अंतिम अहवालही सिद्ध झाला आहे. उर्वरित ९ प्रकरणांमध्ये बलपूर्वक धर्मांतर करण्यात आल्याचे ठोस पुरावे विशेष अन्वेषण पथकाला मिळाले आहेत.

हिंदु तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी पैशांचा वापर

धर्मांध हे समाजमाध्यमांवर बनावट खाते सिद्ध करून युवतींशी मैत्री करतात. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. या काळात युवक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. युवतींचा ‘ब्रेनवॉश’ केला जातो. त्यानंतर विविध आमिषे दाखवून स्वत:समवेत नेले जाते आणि बळजोरीने धर्मांतर घडवले जात असल्याचे दिसून आले आहे. (‘लव्ह जिहाद’ हे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याने त्याच्यासाठी विदेशांतून मोठ्या प्रमाणात पैसे येत आहेत, असे दावे केले जात असतांना या गरीब असलेल्या धर्मांध तरुणांकडे येणारा पैसा हा तोच असणार, यात संशय घेण्याचे कारण नाही. उत्तरप्रदेश पोलिसांनी आता याची पाळेमुळे खणून काढून देशातील पुरो(अधो)गाम्यांना ‘लव्ह जिहाद’ काय आहे, ते दाखवून द्यावे ! – संपादक)

धर्मांध गरीब घरातील असतांना त्यांना महागड्या अधिवक्त्यांचे साहाय्य

‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातील धर्मांध आरोपी आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील असल्याचे मागील ५ प्रकरणांमध्ये लक्षात आले. असे असतांनाही या धर्मांधांनी जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत महागड्या अधिवक्त्यांचे साहाय्य घेतले आहे. त्यामुळे त्यांना वित्तपुरवठा करण्यामागे एखादी प्रतिबंधित संघटना आहे का ? याचा खुलासा विशेष अन्वेषण पथकाच्या अहवालातून होऊ शकतो. (‘लव्ह जिहाद’ हे षड्यंत्र असल्याने अशा प्रकारचे साहाय्य या धर्मांध तरुणांना मिळत आहे, हे पुन्हा स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *