Menu Close

यवतमाळ येथे धर्मांध जमावाकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांधांना कह्यात घेतल्याचा राग

पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावू न देणारे उद्दाम धर्मांध ! सर्वत्र आणि सातत्याने दिसणारा धर्मांधांचा उद्दामपणा पोलीस कायमचा कधी मोडून काढणार ?

दारव्हा येथे धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक केली.

यवतमाळ – अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांधांना कह्यात घेतल्याच्या कारणावरून दारव्हा एका येथे धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक केली. या घटनेत २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

येथे गांज्याची विक्री करण्याच्या संशयावरून पोलिसांनी तरोडा येथील शेख इरफान शेख शब्बीर याच्यासह २ तरुणांना कह्यात घेतले होते. शेख याने संतप्त होऊन पोलिसांशी वाद घातला. त्याने पोलिसांवर आक्रमण केल्यामुळे पोलिसांनाही प्रतिकार करावा लागला. त्यानंतर धर्मांध तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता त्यांपैकी इरफान याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीत इरफानचा मृत्यू झाल्यामुळे धर्मांधांनी हे कृत्य केल्याची चर्चा आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *