Menu Close

(म्हणे) ‘भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची भाजपने फाळणी केली !’ – पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

  • जगातील एकमात्र हिंदुबहुल देशाची फाळणी करून १० लाख हिंदूंची हत्या कुणी केली, हे मेहबूबा मुफ्ती का सांगत नाहीत ?

  • मुसलमानबहुल काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित कुणी आणि का केले ? सहस्रो हिंदूंना त्यांच्या बायका आणि मुले सोडून जाण्यास मशिदींमधून कुणी सांगितले ? त्यांच्या हत्या कुणी केल्या ? हे मेहबूबा मुफ्ती का सांगत नाहीत ?

  • मुसलमानबहुल देशांमध्ये अल्पसंख्यांकांची स्थिती काय होते, हे जगाने पाहिले आणि बहुसंख्य हिंदूंच्या देशात मुसलमान कसे रहात आहेत, हेही जग पहात आहे, हे मेहबूबा मुफ्ती यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे !

पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – हे दुर्दैव आहे की, भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची फाळणी करण्यात आली आहे आणि तीही भारताच्या राज्यघटनेद्वारे नाही, तर ती एका पक्षाने केली आहे, अशी टीका पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी येथे पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केली. या वेळी त्यांनी जम्मू-काश्मीरला दिला गेलेला विशेष राज्याचा दर्जा व्याजासहित परत देण्याचीही मागणी केली.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, आमचा पक्ष राज्यातील शांततेसाठी आणि लोकांच्या अधिकारांसाठी नेहमीच लढत राहील. काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी आणि येथील रक्तपात रोखण्यासाठी पाकसमवेत चर्चा केली पाहिजे. यात काहीच चुकीचे नाही.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *