Menu Close

येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्तीसगड येथे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना अन् हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान

पू. अशोक पात्रीकर

नागपूर – जीवनातील तणाव हा बाह्य कारणांमुळे केवळ १० टक्के, तर आंतरिक कारणांमुळे ९० टक्के असतो. यावर केवळ साधनेद्वारे मात करता येऊन खर्‍या अर्थाने आनंदी जीवन जगता येऊ शकते. येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगड येथील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी आयोजित केलेल्या ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना अन् हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ ४०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश श्री. हेमंत कानस्कर यांनी सांगितला.

निधर्मी कायदे आणि निधर्मी शिक्षणव्यवस्था यांमुळे हिंदूंची दु:स्थिती झाली ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

छत्तीसगडमध्ये धर्मांतराची समस्या गंभीर झाली असून ‘आदिवासी हे हिंदु नाहीत’, असे सांगून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जाते. हिंदूंच्या या स्थितीला शिकवला जात असलेला विकृत इतिहास, निधर्मी कायदे आणि निधर्मी शिक्षणव्यवस्था उत्तरदायी आहे. हिंदु राष्ट्राची मागणी ही पूर्णतः घटनात्मक असून ती लावून न धरल्याने आज देशात ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. पंजाबमधील ‘मलेरकोटला’सारख्या जिल्ह्यात मुसलमान बहुसंख्य झाले; म्हणून तो ‘मुसलमान बहुसंख्य जिल्हा’ घोषित करण्यात आला. त्यानंतर त्या जिल्ह्यासाठी ५०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले. याच न्यायाने हिंदूबहुल भारताला हिंदु राष्ट्र घोषित का केले जाऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्र हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर आहे; मात्र त्यासाठी धर्मप्रेमींनी आठवड्यातून एकदा एकत्र येऊन धर्मशिक्षण घेणे
आवश्यक आहे.

क्षणचित्रे

१. ‘अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे, ही आज काळाची आवश्यकता आहे’, असे मत अनेक धर्मप्रेमींनी व्यक्त केले.

२. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *