Menu Close

बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

यवतमाळ आणि कारंजा (वाशीम) येथे निवेदनाद्वारे मागणी !

बांगलादेशातील हिंसाचार

यवतमाळ – बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्‍या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी ललित कुमार वर्‍हाडे यांच्या माध्यमातून पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. या वेळी ‘इस्कॉन’चे श्री. अभिरामजी दास, पुजारी श्री. ब्रजेन्द्र नंदन दास, श्रीरामनवमी उत्सव समितीचे सदस्य श्री. मनोज औदार्य, युवासेवा संघाचे श्री. गणेश साठे, हिंदुत्वनिष्ठ मंगेश साखरकर, सनातन संस्थेचे श्री. पांडुरंग पिल्लेवार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते. कारंजा (वाशिम) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातही निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित  होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *