Menu Close

हिंदूंवरील परकियांची आक्रमणे टाळण्यासाठी हिंदूंना शौर्यशाली इतिहास जाणण्याची आवश्यकता ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात १२० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती

श्री. राजन बुणगे

सोलापूर – ‘जोपर्यंत महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरला नव्हता, तोपर्यंत यवनांशी झुंज देत होता आणि जेव्हा आम्ही भारतात आलो, तेव्हा या महाराष्ट्राला छत्रपतींच्या इतिहासाचा विसर पडला होता. त्यामुळे आम्ही भारतावर राज्य करू शकलो’, हे इंग्रज निरीक्षकाने दिलेले उत्तर हिंदूंना विचार करण्यास भाग पाडणारे आहे. हिंदू शौर्यशाली इतिहास विसरले आहेत. त्यामुळे आजही हिंदूंवर परकियांकडून होत असलेली आक्रमणे टाळण्यासाठी हिंदूंनी पुन्हा स्वतःचा इतिहास जाणण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. राजन बुणगे यांनी केले. येथील माधवनगर भागात धर्मप्रेमींनी शिवजयंती साजरी केली. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला १२० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले, तर समितीचे श्री. मिनेश पुजारे, श्री. संदेश कोंडस्कर आणि कु. चारुशीला शिंदे यांनी कराटे, लाठी-काठी आणि दंड साखळी यांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाची सांगता हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.

क्षणचित्रे

१. धर्मप्रेमी युवकांनी कार्यक्रमस्थळी येतांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समवेत घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत प्रवेश केला.

२. कार्यक्रमानंतर धर्मप्रेमींनी माधवनगर भागात स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *