Menu Close

आसाममध्ये अनेक आतंकवादी गट सक्रीय ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

  • आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांचा निर्माता असणार्‍या पाक आणि बांगलादेश यांचा नायनाट करणे आवश्यक !

  • स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देश जिहादी आतंकवादाने पोखरलेला असणे, हे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये आताही अनेक आतंकवादी गट सक्रीय आहेत. या आतंकवादी गटांचा बीमोड करण्यासाठी राज्य पोलीस काम करत आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी नुकतेच येथे सांगितले. आसाम पोलिसांनी भारतीय उपखंडातील अल् कायदाशी (‘पाया’ किंवा ‘आधार’) संलग्न असलेल्या बांगलादेशी जिहादी संघटनेशी संबंधित बांगलादेशी नागरिकासह ५ जणांना काही दिवासांपूर्वी अटक केली होती.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले, ‘‘गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आम्ही आसाममधील आतंकवादी कारवायांच्या विरोधात काम करण्यासाठी एक विशेष शाखा स्थापन केली होती. आसाम पोलिसांनी कह्यात घेतलेल्या आतंकवाद्यांच्या चौकशीच्या वेळी नवीन माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे आसाममध्ये निकटच्या काळात जिहादी आतंकवाद्यांपासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो.’’

प्रतिकात्मक चित्र

आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी सांगितले की, कह्यात घेतलेला बांगलादेशी नागरिक सैफुल्ल इस्लाम उपाख्य हारूण रशीद हा अवैधरित्या भारतात घुसला होता आणि ढकलियापारा मशिदीत शिक्षक म्हणून काम करत होता. (मदरशांचे खरे स्वरूप जाणा ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *