Menu Close

साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

धर्मांधांकडून हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरचे पडसाद

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने तात्काळ हिंदूंचे रक्षण करून त्यांना पलायन करण्यापासून परावृत्त करावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

साबरकांठा (गुजरात) – येथील हिंमतनगरच्या मुसलमानबहुल वंजारावासा भागामध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. यात एका हिंदूचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात हिंदूंच्या ८० घरांवर आक्रमण करण्यात आले होते. या घटनेनंतर येथील अल्पसंख्य हिंदू भीतीपोटी येथील त्यांची घरे विकून पलायन करू लागल्याचे समोर येत आहे. काही हिंदूंनी येथील मंदिरांमध्ये आश्रय घेतला आहे.

१. या भागात रहाणार्‍या एका हिंदूने सांगितले, ‘आम्ही ६० ते ७० कुटुंबे आहोत, तर येथे मुसलमानांची २ सहस्र कुटुंबे आहेत. जेव्हा ते आक्रमण करतात, तेव्हा आम्ही आमचे रक्षण करू शकत नाही कि त्यांचा सामना करू शकत नाही. यामुळे आम्ही येथून पलायन करत आहोत.

२. अन्य एका व्यक्तीने पोलिसांवर आरोप करतांना म्हटले की, पोलीस हिंदूंना सुरक्षा देण्याऐवजी ते हिंदूंना अयोग्य पद्धतीने अटक करत आहेत. (हे जर सत्य असेल, तर अशा पोलिसांवर तात्काळ कारवाई करून त्यांना बडतर्फ करणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *