‘द बनारस बार असोसिएशन’च्या सभागृहामध्ये करण्यात आले आयोजन
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2022/04/Fact_News_Page4_Photo_320.jpg)
या वेळी ‘काश्मिरी हिंदूंचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये ‘पनून कश्मीर’ नावाने स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करावा’, या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
१. ‘द बनारस बार असोसिएशन’चे अध्यक्ष अधिवक्ता धीरेंद्रनाथ शर्मा म्हणाले, ‘‘या प्रदर्शनाने अधिवक्ता आणि सामान्य लोक यांना जागृत करण्याचे काम केले आहे. हे प्रदर्शन पाहून असे वाटते की, काश्मीरमध्ये जे क्रौर्य झाले, ते फारच हृदयद्रावक आणि चुकीचे आहे.’’
२. अधिवक्ता रत्नेश्वरकुमार पांडे म्हणाले, ‘‘या प्रदर्शनातून समजते की, वर्ष १९९० मध्ये जिहाद्यांनी भयंकर क्रौर्य दाखवले होते. अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमीच आयोजित करत रहावे.’’