Menu Close

जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांधांच्या क्लृप्त्या !

विविध उद्योग कपटाने कह्यात घेऊन एकाधिकार निर्माण करणे, हाही एक प्रकारचा ‘जिहाद’च !

 

आज राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी असणार्‍यांनी भंगार, फळे, फुले, कापड, पादत्राणे, प्लास्टिक आदी उद्योग, तसेच कपडे शिवणार्‍या शिंप्यांकडील कारागीर, बांगडीवाले, हातावर मेंदी काढणारे, दगडांवर कोरीव काम करणारे आदी अनेक प्रकारच्या क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. हे करतांना त्यांनी हिंदु व्यावसायिकांना अक्षरशः फसवून, प्रसंगी स्वस्तात माल विकून उद्योग किंवा व्यवसाय यांवर त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. हाही एकप्रकारचा जिहादचाच भाग आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !


अमली पदार्थांचा व्यवसाय वाढवून हिंदूंची पिढी उद्ध्वस्त करणे हाही ‘जिहाद’च !

पंजाबमध्ये पकडलेले अमली पदार्थ आणि तस्कर

धर्मांधांकडून हिंदूंची म्हणजे भारताची भावी पिढीच उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने भारतात अधिकाधिक अमली पदार्थांचा व्यवसाय कसा वाढेल आणि देशातील हिंदूंची युवा पिढी त्यात पूर्णपणे ओढली जाऊन ती उद्ध्वस्त कशी होईल, या दृष्टीने नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आले. युवतींना फसवून त्यांना अमली पदार्थ देऊन ते घेण्यासाठी लाचार बनवण्याच्याही कित्येक घटना उघडकीस आल्या. पंजाबमध्ये पाकपुरस्कृत जिहाद्यांनी अमली पदार्थांचे जाळे पसरवून युवा पिढीला खाईत ढकलले आहे.


छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणार्‍या गड-दुर्गांवर मजारी किंवा थडगी यांचे प्रस्थ वाढवणारा ‘गड-जिहाद’ !

रायगड जिल्ह्यातील कुलाबा गडावर अवैधरित्या बांधलेल्या थडग्याला वर्ष २०२२ मध्ये पांढरा रंग देण्यात आला.

हिंदूंच्या मोगलांविरोधातील पराक्रमाचे सर्वाेच्च आदर्श स्थान असणार्‍या, पाच पातशाह्यांना धूळ चारणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध गड-दुर्गांवर मजारी किंवा थडगी बांधून नंतर त्याचे प्रस्थ वाढवत नेऊन तिथे उरुसादी उत्सव साजरे करणे, त्या भागात वहिवाट बनवणे, धर्मांधांची वस्ती वाढवणे आदी करून धर्मांध ‘गड जिहाद’च्या माध्यमातूनही ‘जिहाद’ करत आहेत.


काँग्रेसने पक्षाची मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठी मुसलमानांचे लांगूलचालन केल्याने हिंदूंच्या हक्कांचा संकोच होणे !

 

धर्मांधांनी आतापर्यंत काँग्रेस सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारे हिंदूंवर अन्याय आणि मुसलमानांचे तुष्टीकरण करणारा ढोंगी निधर्मीवाद राबवून घेतला. यात मुसलमानांना सर्व ठिकाणी प्रचंड सवलती घेणे, शासकीय योजना स्वत:साठी राबवून घेणे, शिष्यवृत्ती घेणे, पाठ्यपुस्तकांतून इस्लामी राज्यकर्र्त्यांचे उदात्तीकरण आणि हिंदूंचा खरा इतिहास लपवून खोटा इतिहास निर्माण केलेली पाठ्यपुस्तके प्रसिद्ध करून घेणे (काँग्रेस सरकारचे पहिले ६ शिक्षणमंत्री मुसलमान होते.) हजसाठी सवलती घेणे, मदरशांना अनुदान घेणे, हज हाऊसला साहाय्य घेणे, उर्दू घरे निर्माण करणे आदी अनेक गोष्टी सरकारकडून करवून घेतल्या. इंदिरा गांधी यांनी वर्ष १९६७ मध्ये राज्यघटनेत ‘निधर्मी’ शब्द घुसडला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘या देशावर मुसलमानांचा पहिला हक्क आहे’, असे विधान केले. हे सर्व मतपेटीच्या जोरावर धर्मांधांनी काँग्रेसकडून करून घेतले. पोलीस प्रशासनाला राज्यकर्त्यांनी कायमच हिंदूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, त्यांना कारागृहात टाकणे आणि मुसलमानांना सोडणे, त्यांना न पकडणे असे जणू आदेशच देऊन ठेवले होते. त्यामुळे आतापर्यंत हिंदूंवर इतका प्रचंड अन्याय झाला आहे की, त्याची गणतीच करू शकत नाही. अशा सहस्रो गोष्टी करून काँग्रेस सरकारच्या माध्यमातून मुसलमानांनी मतपेटीचे गाजर दाखवून हिंदूंच्या मूलभूत हक्कांचा संकोच करून एक प्रकारे ‘छुपा जिहाद’च राबवला !


विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणे हाही जाणीवपूर्वक केलेला जिहाद !

हळूहळू होणार्‍या विषप्रयोगाप्रमाणे चित्रपटांसमवेत अनेक विज्ञापनांतून हिंदु धर्माचा मोठ्या प्रमाणात अवमान करण्यात येऊन इस्लाम पंथाचा उदोउदो करण्यात येत आहे !

 

१. ‘ब्रूकबाँड’ चहाच्या विज्ञापनात मुसलमान स्त्रीकडे जाण्यास कचरणारे हिंदु कुटुंब नंतर तिच्याकडे चहा पिण्यास जाते. होळीच्या वेळी रंगांमुळे पोषाख खराब होण्यापासून वाचवण्यासाठी एका लहान मुलीला मुसलमान मुलगा बाजूला घेऊन जातो, असे ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनात दाखवण्यात आले. हिंदु असलेल्या सुनेच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम मुसलमान कुटुंबात साजरा होत असल्याचे ‘तनिष्क’च्या विज्ञापनात दाखवण्यात आले, तर ‘मलबार ज्वेलर्स’च्या विज्ञापनात सणाच्या दिवशी दागिने घातलेल्या; परंतु कुंकू न लावलेल्या अभिनेत्रीला दाखवण्यात आले. अशी अनेक उदाहरणे आहेत. यातून अप्रत्यक्षरित्या ग्राहक, नवीन पिढी यांच्या मनात हिंदु धर्माला तुच्छ लेखणे, धर्माचरण किंवा धर्म यांचा त्याग करणे आदी संस्कार सूक्ष्म स्तरावर हिंदूंच्या मनावर बिंबवले जातात आणि इस्लाम श्रेष्ठ असल्याचे प्रतीत केले जाते. भारतात ८५ टक्के हिंदु ग्राहक असूनही हे विज्ञापनदाते हे साहस करतात; कारण धर्माभिमानशून्य असणारे हिंदु त्यांच्याकडून उत्पादनेही घेणार हे त्यांना ठाऊक असते !


हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन करून आणि मुसलमान समाजाची प्रतिमा उंचावून त्यांचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण !

 

गेली कित्येक दशके आतंकवादी दाऊदपुरस्कृत असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकार आणि पार्श्वकलाकार, तसेच दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार आदींच्या माध्यमातून मुसलमानांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. या माध्यमातून हिंदु देवता, धर्म, ऋषिमुनी, धर्मगुरु, पुजारी, रिती-रिवाज, सण-उत्सव, परंपरा, अन्य धार्मिक प्रतिके यांची यथेच्छ टिंगल करणे, त्यांच्यावर अश्लाघ्य विनोद करणे, त्यांना तुच्छ लेखणे, त्यांचा अवमान करणे या सर्व गोष्टी कुचकामी आणि निरुपयोगी दाखवणे, तसेच गीते अन् संवाद यांच्या माध्यमातून उर्दू शब्दांची यथेच्छ रेलचेल करून हिंदी भाषा नष्ट करणे आदी गोष्टी करण्यात आल्या आणि येत आहेत. दुसर्‍या बाजूला ‘मुसलमान समाज आणि त्यांचे धर्मगुरु कसे चांगले आहेत’, हे दाखवून इस्लाम पंथाचे उदात्तीकरण करण्यात आले. हे सर्व इतके बिनबोभाट झाले की, हिंदूंना ते कळलेच नाही. इस्लाम पंथीय नटांचे वर्चस्व निर्माण करून आणि त्यांची नायिका हिंदु दाखवून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यात आले.


हिंदूबहुल भारताचे श्रद्धास्थान असणार्‍या गोमातेचा वंशविच्छेद करून गो-जिहाद !

 

सहस्रो अवैध पशूवधगृहे आदी सर्व प्रकारांत धर्मांधच अधिक असतात. कायदा असूनही पोलीस त्यांच्यावर स्वतः कारवाई करत नाहीत, तर बहुसंख्य वेळा त्यांचा मार खाऊन येतात. गेली अनेक शतके हा गो-जिहाद चालू राहिल्याने कोट्यवधींचे गोधन आता अतिशय अल्प झाले आहे आणि कित्येक देशी गायींच्या जातीही नष्ट होत चालल्या आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *