Menu Close

हिंदूंनो, जिवंत रहाण्यासाठी लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नागराजूची हत्या : सेक्युलर गँग गप्प का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

श्री. टी. राजासिंह

मुंबई – भारत हे ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र असल्यामुळेच भाग्यनगर (हैद्राबाद) येथील नागराजू या हिंदु युवकाची दिवसाढवळ्या हत्या झाली. जोपर्यंत भारत अखंड ‘हिंदु राष्ट्र’ होत नाही, तोपर्यंत हिंदू अशाच प्रकारे मारले जातील. नागराजूची हत्या करणारे धर्मांध असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. उलट तेलंगाणा सरकार आणि एम्.आय.एम्. पक्ष धर्मांधाला वाचवण्याचा प्रयत्न करतील. ज्या वेळी नागराजूला मारले जात होते, तेव्हा तेथे उपस्थित असलेले ९० टक्के हिंदू शांत होते. हिंदू लढू इच्छित नाहीत, तर मरणासाठी सिद्ध आहेत. हिंदू आज ‘सेक्युलर’ झाले असून ते ‘हिंदु-मुसलमान भाई भाई’ची विचारधारा घेऊन जगत आहे. अशा ‘सेक्युलर’ हिंदूंनी लक्षात घ्यावे की, उद्या हे धर्मांध तुमच्या बहिणीला, मुलीला आणि आईला घरातून उचलून नेतील. त्यामुळे हिंदूंनो, जिवंत रहायचे असेल, तर लढायला आणि आत्मरक्षण करायला शिका. अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला कपाळावर टिळा लावण्यासाठी विचार करावा लागेल, असे रोखठोक प्रतिपादन गोशामहल (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नागराजूची हत्या : सेक्युलर गँग गप्प का ?’, या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

हिंदूंनी स्वत:च्या रक्षणासाठी लढायला शिकणे आवश्यक ! – समीर चाकू, राष्ट्रीय सहसंस्थापक, द लीगल हिंदु

श्री. समीर चाकू

निर्घृणपणे हत्या झालेला नागराजू हा हिंदु असल्यामुळे काँग्रेसचे राहुल गांधी, ‘आप’चे अरविंद केजरीवाल, साम्यवादी आणि सेक्युलर पक्षवाले तेथे भेटायला जाणार नाहीत; कारण ते धर्म-जाती आधारित राजकारण करतात. प्रसिद्धीमाध्यमेही त्याला विशेष प्रसिद्धी देणार नाहीत. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या रक्षणासाठी लढायला शिकायला हवे.

देशभरात झालेल्या अनेक हिंदूंच्या हत्यांमागे मोठे षड्यंत्र ! – उमेश गायकवाड, मुंबईचे माजी संयोजक, बजरंग दल

श्री. उमेश गायकवाड

केवळ नागराजूच नव्हे, तर या आधी देशभरात झालेल्या अनेक हिंदूंच्या हत्यांमागे मोठे षड्यंत्र आहे. आता तर आतंकवादी, खलिस्तानी आणि नक्षलवादी एकत्र आले आहेत. मुंबईतील एका प्रकरणाच्या चौकशीत वर्ष २०२४ मध्ये देशात मोठी दंगल घडवण्याचे षड्यंत्र चालू असल्याचे समोर आले आहे. एक मोठा संघर्ष होणार आहे. त्यामुळे हिंदूंनी व्यवस्थेसह राहून लढायला पाहिजे.

हिंदूंच्या हत्या करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. नरेंद्र सुर्वे

भारतात हिंदूंच्या हत्या करून हिंदूंनाच कलंकित करण्याचे जागतिक षड्यंत्र चालू आहे. हिंदूंच्या हत्या करणाऱ्या जिहाद्यांना सोडवण्यासाठी ‘जमियत-ए-उलेमा’ आर्थिक साहाय्य करत आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यांत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने अनेक हिंदूंच्या हत्या केल्या आहेत. त्यामुळे तिच्यावर केंद्राने बंदी आणली पाहिजे. हिंदूंनी आता स्वरक्षणासाठी जागृत झाले पाहिजे. निद्रिस्त हिंदूंना विविध प्रकारच्या जिहादची माहिती, तसेच स्वधर्माचे शिक्षण देऊन जागृत केले पाहिजे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *