Menu Close

गोवा येथील चर्चंनी बळकावलेल्‍या मंदिरांच्‍या पूनर्स्‍थापनेसाठी हिंदूंना एकत्रित लढा द्यावा लागेल ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्‍य संघचालक, भारत माता की जय संघ, गोवा

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवशीचे पहिले सत्र

मंदिरांवरील इस्‍लामी आणि ख्रिस्‍ती अतिक्रमणाच्‍या आघाताला मान्‍यवरांनी फोडली वाचा !

प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्‍य संघचालक, भारत माता की जय संघ, गोवा

रामनाथी : पोर्तुगीज सरकारच्‍या काळात गोवा येथील लहान-मोठी अशी १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यात आली. यांत वरेण्‍यपुरी (वेरणा) आणि श्री विजयादुर्गादेवी (शंखवाळी) ही केवळ २ मंदिरे चर्चच्‍या आक्रमणापासून वाचली. ही मंदिरे राज्‍य पुरातत्‍व विभागाच्‍या अंतर्गत संरक्षित म्‍हणून घोषित करण्‍यात आली आहेत. असे असतांनाही मागील अनेक वर्षे या मंदिराची भूमी गिळंकृत करण्‍याचे षड्‌यंत्र चर्चच्‍या माध्‍यमातून चालू आहे. गोवा येथील चर्चंनी बळकावलेल्‍या मंदिरांच्‍या पूनर्स्‍थापनेसाठी हिंदूंना एकत्रित लढा द्यावा लागेल, असे आवाहन गोवा येथील ‘भारत माता की जय संघा’चे राज्‍य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या द्वितीय दिनी ‘मंदिरांवर झालेले इस्‍लामी आणि ख्रिस्‍ती अतिक्रमण’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर वाराणसी येथील अधिवक्‍ता मदन मोहन यादव, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे प्रवक्‍ते अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन आणि सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर उपस्‍थित होते.

या वेळी  प्रा. सुभाष वेलिंगकर म्‍हणाले,  ‘‘वरेण्‍यपुरी (वेरणा) आणि श्री विजयादुर्गादेवी या मंदिरांची भूमी गिळंकृत करण्‍यासाठी मंदिराच्‍या परिसरातील झाडे तोडणे, शेजारील तलाव बुजवणे यांसह अनेक अवैध गोष्‍टी चालू आहेत. या संदर्भात हिंदू भाविकांनी केलेल्‍या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.’’

अन्य सूत्र 

१. विजयादुर्गादेवी हे स्‍थान पुरातत्‍व विभागाकडे ‘फ्रंटीस पिस ऑफ सांकवाळ’ या नावाने संरक्षित आहे. शासकीय स्‍तरावरही हे स्‍थान जतन करण्‍यासाठी अत्‍यंत दुर्लक्ष केले जात आहे.

२. या ठिकाणी पुरातत्‍व विभागाच्‍या अनुमतीविना कोणतीही कृती करता येत नाही. असे असतांनाही येथे धार्मिक कार्यक्रम करून ‘ही भूमी चर्चची आहे’, असे दाखवण्‍याचा प्रयत्न ख्रित्‍यांकडून चालू आहे.

३. मागील १० वर्षांपासून चर्चच्‍या माध्‍यमातून ही भूमी बळकवण्‍याचे षड्‌यंत्र चालू असून याला विरोध करणार्‍या हिंदूंवर खोटे गुन्‍हे नोंद करून त्‍यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे.

४. मंदिर परिसरात असलेले मंदिरांच्‍या अवशेषांचे दगड जेसीच्‍या साहाय्‍याने ती भूमीत गाडून टाकण्‍यात आली.

५. या परिसरात अन्‍य भागातून अनेक ख्‍रिस्‍त्‍यांची पदयात्रा काढून या भागाला भेट दिली जाते आणि हा भाग चर्चचा असल्‍याचे लादले जात आहे.

मंदिरांवर आक्रमण करून आक्रमकांनी हिंदूंना दुर्बल केले ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

मंदिरे ही हिंदूंसाठी आदराचे आणि सन्‍मानाचे स्‍थान आहे. त्‍यामुळे मंदिरे पुन्‍हा हिंदूंच्‍या कह्यात देऊन हिंदूंचे वैभव त्‍यांना पुन्‍हा मिळवून देणे आवश्‍यक आहे. पूर्वी होऊन गेलेल्‍या राजांनीही मंदिरांच्‍या उभारणीला आणि संरक्षणाला महत्त्वाचे स्‍थान दिले होते.  ज्‍याप्रमाणे राजा-महाराजांवर आक्रमण झाल्‍यास प्रजा दुर्बल होते, त्‍याप्रमाणे आक्रमकांनी मंदिरांवर आक्रमण करून हिंदूंना दुर्बल केले आहे. भोज राजाने भोजशाळेच्‍या माध्‍यमातून संस्‍कृत पाठशाळा उभारली होती. याच ठिकाणी वर्ष १०३४ मध्‍ये भोजराजाने एका मंदिर उभारले होते; मात्र त्‍या ठिकाणी धर्मांधांनी आक्रमण करून मंदिर उद़्‍ध्‍वस्‍त केले आणि तेथे मशीद असल्‍याचे घोषित केले. कालांतराने त्‍या ठिकाणी मुसलमानांना प्रत्‍येक शुक्रवारी नमाजासाठीही अनुमती देण्‍यात आली. भोजशाळेतील अनेक ऐतिहासिक वास्‍तू उद़्‍ध्‍वस्‍त करून त्‍या ठिकाणी धर्मांधांनी अतिक्रमण केल्‍याचे अनेक पुरावे उपलब्‍ध आहेत. ‘मंदिर मुक्‍ती संग्रमा’मध्‍ये जाती, पद, पक्ष, संघटना विसरून हिंदु समाज संघटित झाल्‍यास सर्व मंदिरे हिंदूंच्‍या कह्यात येण्‍यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन हिंदु फ्रंट फॉर जस्‍टीसचे प्रवक्‍ते अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रात ‘अयोध्‍या-काशी-मथुरा यानंतर आता होणार भोजशाला मुक्‍ती संग्राम’ या विषयावर ते बोलत होते.

अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन विषय मांडत असतांना भोजशाळेच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेल्‍या इस्‍लामिक अतिक्रमणाविषयी सविस्‍तर माहिती देतांना भोजशाळेतील हिंदु संस्‍कृतीचे प्रतीक असलेल्‍या कलाकृती आणि ऐतिहासिक अवशेष यांची ‘प्रोजेक्‍टर’वर छायाचित्रे दाखवण्‍यात आली. भोजशाळेच्‍या भिंतींच्‍या दगडांवर कोरलेले संस्‍कृत श्‍लोक, धर्मचक्र, मंदिरांची कलाकृती असलेल्‍या कमानी आणि खांब, तसेच मुख्‍य मंदिराच्‍या मंडपाची छायाचित्रे दाखवण्‍यात आली.

काशी आणि मथुरा येथील मंदिरे कह्यात घेतल्‍यानंतर हिंदूंनी पुढच्‍या कार्याचा विचार करावा ! – अधिवक्‍ता मदन मोहन यादव, वाराणसी, उत्तर प्रदेश

अधिवक्‍ता मदन मोहन यादव, वाराणसी, उत्तर प्रदेश

ज्‍यू संपूर्ण जगात विखुरले असतांनाही त्‍यांनी ‘इस्रायल’ या त्‍यांच्‍या स्‍वतंत्र राष्‍ट्राची निर्मिती केली, मग हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करणे काहीही अशक्‍य नाही. भाजपच्‍या नेत्‍या नुपूर शर्मा यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर ५७ इस्‍लामिक राष्‍ट्रे छाती बडवत आहेत; परंतु दुसर्‍या बाजूला कथित ज्ञानवापी मशिदीच्‍या भिंती ज्ञानवापी हे मंदिर असल्‍याचे ओरडून सांगत आहेत. ज्ञानवापीच्‍या लढ्यात आम्‍हाला प्रसिद्धीमाध्‍यमांचे साहाय्‍य मिळाले. माध्‍यमांमध्‍येही जिहादी आणि साम्‍यवादी विचारांचे लोक आहेत. हिंदुत्‍वाच्‍या कार्यासाठी आपल्‍याला साहाय्‍य करणार्‍या माध्‍यमांना जोडून ठेवायला हवे. काशी येथील विश्‍वनाथ मंदिर ७ वेळा उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍यात आले. काशी हे हिंदूंच्‍या धार्मिक विधींचे क्षेत्र आहे. इतिहासकाळात येथील हिंदूंची १० धार्मिक स्‍थाने नष्‍ट करण्‍यात आली. येथे बिंदू माधवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्रख्‍यात संतकवी रामानंदाचार्यांनी येथेच तपस्‍या केली. या ठिकाणी मशीद उभारल्‍याचे पाहून त्रास होतो. काशी आणि मथुरा येथील मंदिरे कह्यात घेतल्‍यानंतर हिंदूंनी पुढच्‍या कार्याचा विचार करावा.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *