Menu Close

म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ! – भाजपचे राजस्थानमधील खासदार खिचर

नरेंद्र कुमार खिचर

जयपूर – म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली. एकालाच पंतप्रधान करता येणार होते. गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

या वक्तव्याला विरोध होऊ लागल्यावर खिचर स्पष्टीकरण देतांना म्हणाले, ‘‘सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान व्हायला हवे होते. गांधी यांची इच्छा असती, तर बोस पंतप्रधान होऊ शकले असते. गांधी यांच्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या केली. खरोखर मारले नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे !’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *