Menu Close

जयपूर येथे लव्ह जिहाद : हिंदु मुलीशी ‘निकाह’ केल्यास मिळतात २५ लाख रुपये !

  • ‘लव्ह जिहाद हे षड्यंत्र नसून हिंदुत्वनिष्ठांनी रचलेले कुंभाड आहे’, असा वारंवार आरोप करणारी धर्मनिरपेक्षतावादी टोळी, तसेच पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे यांना आता काय म्हणायचे आहे ?
  • आतापर्यंत इस्लामिक स्टेटकडून शिरच्छेदासारख्या घटना या सहस्रावधी किलोमीटर दूर सीरिया, इराक आदी देशांत घडत होत्या. आता अशा घटना आणि तशा प्रकारच्या धमक्या भारतात हिंदूंना दिल्या जात आहेत. हिंदूंनो, यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आतातरी संघटित व्हा !
  • हे २५ लाख रुपये कुणाकडून दिले जातात ?, याचीही माहिती हिंदूंसमोर आली पाहिजे आणि ते देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! -संपादक

(निकाह म्हणजे इस्लामी पद्धतीनुसार केलेला विवाह)

जर मुलीशी निकाह करू दिला नाही, तर वडील आणि मुलगी यांचा शिरच्छेद करण्याची धर्मांधाची धमकी !

जयपूर – येथील सलमान, त्याचा मुलगा असलीन आणि कालू खान यांनी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे दोनदा अपहरण केले. दोन्ही वेळा पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला परत आणले. सध्या ती बालिकागृहामध्ये आहे. आरोपी सलमानने तक्रारदार कुटुंबियांना धमकी देत म्हटले, ‘‘आम्ही एखाद्या हिंदु मुलीशी ‘निकाह’ केल्यास आम्हाला आमच्या समाजाकडून २५ लाख रुपये मिळतात. १५ जुलै या दिवशी तुमच्या मुलीचे वय १८ वर्षे होईल. तेव्हा आम्ही तिचे पुन्हा अपहरण करू आणि तिच्याशी निकाह करू. जर तुम्ही त्यास विरोध केला, तर उदयपूरमधील घटनेप्रमाणे (कन्हैयालाल यांचा शिरच्छेद केल्याप्रमाणे) तुमचा (मुलीच्या वडिलांचा) आणि मुलीचा शिरच्छेद करू !’’ या घटनेवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, सलमानने अशीही धमकी दिली आहे की, मुलीशी विवाह केल्यानंतर आम्ही तिला तलाक देऊ अथवा ठार मारू !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *