Menu Close

सांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी

२ वर्षांपूर्वी पालघर येथे हिंदु साधूंना केलेल्या पुष्कळ मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची जखम भरत नाही, तोच पुन्हा सांगली येथील लवंगा गावात ४ हिंदु साधूंना स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित झाला आहे. ही घटना संताप आणि चीड आणणारी आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तात्काळ नोंद घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

साधूसंतांची भूमी म्हणावणार्‍या महाराष्ट्रात साधूंना सतत होणार्‍या मारहाणीमुळे महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा लज्जेने खाली गेली आहे. एखादा मुसलमान मौलवी (इस्लामी अभ्यासक) वा ख्रिस्ती पाद्री यांच्याविषयी असे कधी घडल्याचे ऐकायला येत नाही. निरपराध हिंदु साधूंना मारहाण होणे, ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हिंदु साधूंविषयी असे वारंवार घडत असेल, तर शासनाने यावर ठोस उपाययोजना काढायला हवी, असेही समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *