Menu Close

कायदा आंधळा आहे ! – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

हिंदु राष्ट्रात कायदा आंधळा नाही, तर डोळस असेल ! कोणत्याही निरपराध्याला कधीही कारागृहात जावे लागणार नाही ! – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात

asaram_bapuजोधपूर – कायदा आंधळा आहे. येथे कोणालाही कारागृहात डांबले जाऊ शकते. एका मुलीने काहीतरी सांगितले; म्हणून एवढ्या लोकांचा छळ केला जात आहे, अशी प्रतिक्रिया पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी येथे दिली. न्यायालयातून बाहेर पडतांना ते पत्रकारांशी बोलत होते.

पू. बापूजी पुढे म्हणाले, मला तुमच्याशी बोलावेसे वाटते; परंतु मी आजारी आहे. मी अनेक आजारांनी पीडित आहे. माझी प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. मला विशिष्ट उपचारांची आवश्यकता असते. अल्पवयीन मुलीचे कथित लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून ३१ ऑगस्ट २०१३ पासून पू. बापूजी कारागृहात आहेत.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *