Menu Close

सिंहस्थपर्वातून परतणार्‍या भाविकांकडून वसूल केले जात आहे ५ रुपये अतिरिक्त भाडे !

  • भाजप सरकारच्या रेल्वे प्रशासनाचे हिंदुद्रोही कृत्य !
  • अन्य धर्मियांच्या सणाला असे कर लावण्याचे धाडस रेल्वे प्रशासन करणार का ?

sinhstha_kumbh_ujjain

उज्जैन : येथे सिंहस्थ पर्वासाठी आलेले भाविक परत जात असतांना रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून सरचार्ज म्हणून ५ रुपये अधिक वसूल करत आहे.

ही भाविकांची आर्थिक लुबाडणूक आणि फसवणूक आहे, असे सामाजिक कार्यकर्ता जयप्रकाश शर्मा यांनी सांगितले.

पहिल्या अमृतस्नानाला अपेक्षित गर्दी नसल्याने खूप सवलती देऊन भाविकांना सिंहस्थाला येण्याचे निमंत्रण राज्यातील भाजप सरकारकडून दिले जात आहे; मात्र केंद्राच्या रेल्वे प्रशासनाकडून सरचार्जच्या (अतिरिक्त भाड्याच्या) नावाखाली अधिकची रक्कम लुबाडली जात आहे, ही गोष्ट भाजपची दुटप्पी भूमिका दर्शवते, असे ते म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *