Menu Close

चिखली (जिल्‍हा बुलढाणा) येथे विवाहाच्‍या वरातीत श्रीरामाचे गाणे लावल्‍यावरून धर्मांधांकडून दंगल !

  • १३ घायाळ

  • १५ जणांना अटक

हिंदूंना त्‍यांच्‍या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार राज्‍यात असतांना अशा प्रकारच्‍या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही ! -संपादक 

(प्रतिकात्मक चित्र)

चिखली (बुलढाणा) – १७ मे या दिवशी येथील एका घरातील विवाहाच्‍या वरातीत डी.जे.वर (मोठी संगीत यंत्रणा) भगवान श्रीरामाचे गाणे लावले होते. ही वरात सैलानीनगर या भागातून जात असतांना धर्मांधांकडून हे गाणे थांबवण्‍यास सांगण्‍यात आले. त्‍याच वेळी धर्मांधांनी या वरातीवर जोरदार दगडफेक चालू केली. या दगडफेकीत वरातीतील १३ हून अधिक लोक घायाळ झाले. त्‍यांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले. याच वेळी पोलिसांना पाचारण करण्‍यात आले. जमावाला पांगवण्‍यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या वेळी धर्मांधांनी डी.जे.ची यंत्रणाही तोडून टाकली. या वेळी धर्मांधांनी ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्‍या.

 (सौजन्य : ABP MAJHA)

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘पाकिस्‍तानच्‍या घोषणा देणार्‍या आरोपींना सोडणार नाही’, असे म्‍हटले आहे. भाजपच्‍या आमदार श्‍वेता महाले आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी या भागाचा दौरा करून नागरिकांना शांतता राखण्‍याचे आवाहन केले. पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *